आकाशाकडे नजरा आता,
भुईवर एकही थेंब नाही,
करपुन गेल रानं माझं,
हिरवळीची आस मेली.
पावसा परत आता तु बरसशील का?
कोरड्या पडलेल्या माझ्या मनाला,
पालवी फुटवुन जाशील का?
कर रं किरपा ह्या बळी राजा ,
हिरावुन नेलास घास का?
पदरी घाल झालेल्या चुका,
बरसुन बरसुन तोड बांध ,
माझ्या आसुसलेल्या आसवाचा.
-गणेश शिंदे, बाशीॅ.