जगातील एकमेव प्रेमळ संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय.
जीवन जगत असताना आपल्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये याची काळजी घेणारा संप्रदाय.
समोरचा आपल्या पुढे झुकला तर आपणही त्याच्यापुढे झुकणे म्हणजे वारकरी संप्रदाय.
कर्म हाच धर्म, आणी धर्म म्हणजेच विठ्ठल असे माननारा.
घरी अठरा विश्व दारिद्र्य असले तरी मनाने मात्र कुबेराचा धनी.
पंढरपूर हाच स्वर्ग आणी चंद्रभागा म्हणजे अमृताने दुथडी वाहणारी नदी.
पांडुरंगावरती निस्सीम श्रध्दा परंतु अंधश्रध्देला कुठेही थारा नाही.
आपल्याकडे असणार्या समुद्रातून ओंजळ भरून देणारे तर अनेक असतात परंतु आपल्या फाटक्या झोळीत मुठभर असतानाही आपले सर्वस्व अर्पण करणे म्हणजे वारकरी.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काळीज, त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर जीवण जगणारा वारकरी.
पसायदानामध्ये सर्व विश्वाचे कल्याण होवो अशी इच्छा व्यक्त करणारे संत ज्ञानेश्वर,
प्रपंच करत असतानाही भगवद भक्ती करणे म्हणजेच जगदगुरु संत तुकाराम महाराज.
संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असा आमचा महाराष्ट्र.
कपाळी टिळा, गळ्यात माळा, दिनांचा कैवारी विठू सावळा.
"यावत चंद्र दिवाकरो" असणारा संप्रदाय म्हणजेच वारकरी संप्रदाय.
श्री हरी...!! 🙏🙏
उत्तर द्याहटवा