शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२०

🧹 स्वच्छता ठेवूया गांधीखातर 🧹

Narendra modi, mahatma gandhi, peace, cleanliness, india
     ज्या भारताला हजारो  वर्षांचा वारसा आहे, ज्या भारताने एकेकाळी सर्व जगाला तंत्रज्ञान, आध्यात्म व जीवन जगायला शिकविले त्या भारतामधील लोकांनाच स्वच्छतेविषयी प्रेरीत करावे लागतेय हे आपले दुर्दैव आहे. अजुनही आपल्याला कचरा रस्त्यावर टाकु नका, शौचालयाच वापर करा, इतरत्र थुंकू नका म्हणून समजवावे लागतय.

     दोन वर्षापूर्वी  माझे मित्र जपानच्या दौर्‍यावर गेले होते तेंव्हा त्यांनी सांगितलेला अनुभव असा आहे की,  जपान या देशमध्ये फिरल्यानंतर कळतेकी देशभक्ती कशाला म्हणतात, कारण तेथे घाण  व कचरा तेथील नागरिक स्वत: करत नाहीत व इतरांना करूही देत नाहीत. जपानमधील शाळेचा पहिला तास हा स्वच्छतेचा असतो, विद्यार्थी व शिक्षक पहिला तास वर्गाची व परीसराची स्वच्छता करण्यात घालवतात. कचरा डस्टबीन मध्येच टाकला जातो मग तो घरी असो किंवा बाहेर, आपण मात्र डस्टबीन नाही हे कारण पुढे करतो परंतु आपण एखादा रिकामा बॉक्स जर कचरा गोळा करण्यास शाळा, कॉलेज, मंदीर, किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी ठेवला तर त्याचा उत्तम डस्टबीन म्हणुन वापर होऊ शकतो.

clean india, swach bharat, tajmahal, lal killa
    जपानमध्ये एके  दिवशी सकाळी एक  स्त्री तिच्या कुत्र्याला फिरायला घेउुन निघाली. रस्त्याच्याकडेला त्याकुत्र्याने घाण केली, त्या स्त्रीने आपल्या पर्समधून एक कॅरीबॅग काढली व ती घाण त्या पिशवीत भरली, ती पिशवी लगेश शेजारच्या कचरा कुंडीत टाकली. सॅनिटायझरने हात स्वच्छ केले व पर्समधून एक स्प्रे काढला व या ठिकाणी कुत्र्याने घाण केली होती त्याच्यावर स्प्रे केला. तिने ती जागा निर्जंतुक केली. आपल्या देशातील परिस्थिति अत्यंत विरोधी आहे. आपण घरातील कचरा रस्त्यावर टाकतो व आपल्याच देशाला नावे ठेवतो.

   जपानमधील सर्व सरासरी आयुष्यमान हे  जगातील इतर लोकांच्या आयुष्यमानापेक्षा ५ ते १० वर्षानी जास्त आहे. स्वच्छतेचा परिणाम शारीरीक, मानसीक व बौध्दिकतेवर होतो असे तर विज्ञानसुध्दा सांगते कारण स्वच्छता असेल तर शरीर सुदृढ राहील, शरीर सुदृढ असेल तर मन व बुध्दि सुदृढ राहू शकते. स्वच्छता ही जबरदस्तीने न करता ती स्वेच्छेने प्रत्येकाने ठेवली पाहिजे. साधे एखादे चॉकलेट किंवा बडिशोप पुडी जरी खाल्ली तरी त्याचे रॅपर लगेच डस्टबीन मध्ये टाकले पाहिजे, जर डस्टबीन उपलब्थ नसेल तर ते रॅपर खिशात ठेवून जेंव्हा डस्टबीन मिळेल तेव्हा त्यात टाकले पाहीजे. अशा प्रकारे आपण वागलो तरच आपला परिसर, गाव व देश स्वच्छ होण्यास मदत होणार आहे.

     आज गांधी जयंती निमित्त आपण संकल्प करूया की, स्वच्छता ही आपल्या पासून सुरू करू.

gandhi jayanti, 2nd october, cleanliness


   
      

       

1 टिप्पणी: