गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

कोरोना काळामध्ये मातृभूमी प्रतिष्ठान मदतीला

Annapurna Yojna

कोरोना काळामध्ये मातृभूमी प्रतिष्ठानने वाटले एक लाख जेवणाचे डबे
दिनांक 23 मार्च, 2020 पासून समग्र भारतामध्ये लॉक डाऊन घोषित झाला , आणि गरीब, बेघर, कामगार लोकांचे अतोनात हाल सुरू झाले , अनेक जण बाहेरगावी अडकले अशा परिस्थितीमध्ये मातृभूमी प्रतिष्ठानने जेवणाचे डबे पोच करण्याचं काम सुरू केलं. दररोज तब्बल दोन हजार डबे वितरित करण्यात येत होते. प्रतिष्ठान मार्फत मास्क व सैनी टायझर देखील वाटण्यात आले. सलग चाळीस दिवस मातृभूमी प्रतिष्ठानचे संचालक मंडळ, सभासद या सर्वांनी अत्यंत मेहनतीने हे काम पूर्ण केले . बार्शी शहरांमध्ये एकही व्यक्ती उपाशी झोपू नये याची आम्ही संपूर्णपणे काळजी घेतली. सदर कालावधीमध्ये बार्शी शहरातील अनेक मोठ्या हॉस्पिटलमध्ये पेशंट व त्यांचे नातेवाईक अडकलेले होते त्या सर्वांना देखील मोफत डबे वितरीत करण्यात आले. दिनांक 17 जुलै,2020 पासून परत एकदा बार्शी शहरांमध्ये दहा दिवसांचा लॉक डाऊन सुरू झाला व आम्ही परत सर्व गरजूंना घरपोच डबा देण्याचे काम अविरतपणे करत आहोत.
तसेच बार्शी नगर परिषदेच्या सहकार्याने बार्शी शहरातील काही वॉर्डांमध्ये ट्रॅक्टरद्वारे सॅनिटायझर फवारणी केली.
यापुढेही केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने मातृभूमी प्रतिष्ठानला एखादा सामाजिक उपक्रम राबविण्यास सांगितल्यास आम्ही तो आनंदाने राबउ.
Annapurna Yojna, Matrubhoomi Pratishthan

दिनांक 15 जून 2014 रोजी बार्शी शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये उत्तम यश मिळविलेल्या व ज्या समाजातून आपण आलोय त्या समाजाप्रति आपलं काहीतरी देणं आहे या भावनेतून वेगवेगळ्या प्रकारे सामाजिक कार्य करणाऱ्या विविध संस्था संघटनांचे अध्यक्ष एकत्र आले व त्या सर्वांनी बार्शी शहर व तालुक्यामध्ये वंचित असणाऱ्या लोकांसाठी व्यापक स्वरूपात कार्य करण्यासाठी मातृभूमी प्रतिष्ठानची स्थापना केली.
ग्रामीण भागामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लांट बसविण्यात आले , महिलांसाठी निवारा शेड उभी करण्यात आली , जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांसाठी चार प्रकारची खेळणी बसविण्यात आली बालवाडीतील मुलांना आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आले केशर आंब्याची रोपे दिली गेली , ग्रामस्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी शिबीर, जलसंधारण अशी वेगवेगळ्या प्रकारची कामे करण्यात आली . त्यानंतर खामगाव सुर्डी व श्रीपत पिंपरी येथे वृद्ध विकलांग निराधार व्यक्तींना रोज दोन वेळेस पुरेल एवढा डबा देण्याचा उपक्रम अन्नपूर्णा योजना या नावाने चालू करण्यात आला . तसाच उपक्रम बार्शी शहरांमध्येही चालू करण्यात आला व बार्शी शहरांमध्ये 164 लाभार्थी नियमित याचा लाभ घेत आहेत .
ग्रामीण भागातून बार्शी शहरांमध्ये वैद्यकीय सेवा घेण्याकरिता मोठ्या प्रमाणावर लोक येत असतात . काही कारणास्तव त्यांची जेवणाची सोय होत नाही ही बाब लक्षात घेऊन प्रतिष्ठानने अवघ्या दहा रुपयात दोन चपाती व भाजी किंवा वरण भात हॉस्पिटलमध्ये देण्याचे चालू केले . पेशंटच्या नातेवाईकांना मोफत वापरासाठी चादर सतरंजी उपलब्ध करून देण्यात आली .
एमपीएससी यूपीएससी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तज्ञ मार्गदर्शन द्वारे स्पर्धा परीक्षेविषयी माहिती देण्यात येते , त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येते . तसेच विविध शासकीय योजनांची माहिती अनेकांना नसते त्या सर्व योजना समजावून सांगणे त्याचे मोफत फॉर्म भरून देणे व त्याचा फॉलॉवर घेणे इत्यादी कामेही प्रतिष्ठान मार्फत केली जातात .
मातृभूमी प्रतिष्ठान हे 12 A, 80G व FCRA नोंदणीकृत आहे .
प्रतिष्ठानला आजपर्यंत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा समाज कल्याण विभागाचा अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

Annapurna Yojna

1 टिप्पणी: