हिंदू धर्मामध्ये सणावारांचे अनन्य महत्व आहे.हे सणवार नसते तर मनुष्य जन्माला आला काय आणी गेला काय, काहीच अर्थ राहिला नसता. सण म्हणजे उत्सव असतो. प्रफुल्लीत मन, आनंदी चेहरा, निर्मळ भावना यांचा सुरेल संगम असतो. प्रत्येक सणावारा मागे काही तरी कथा, शास्त्र, विज्ञान, ईतिहास नक्कीच आहे. कारण हिंदूलोक अविचाराने काहीही करत नाहीत. प्रत्येक सण वेगळा, त्या प्रत्येक सणाची मजा वेगळी, देवी-देवते सोबतच निसर्ग, पशु-पक्षांची पुजा ही करतो.
प्रत्येक सण आप-आपल्या एेपती प्रमाणे साजरा करण्याची मुभा. दिवाळीला श्रीमंत व्यक्ती पन्नास हजाराचे कपडे घेऊ शकतो तर, गरीब पाचशेचे घेऊन त्याच एेटीत मिरवतो. श्रीमंत सगळ्या घरावर रोशनाई करतो तर गरीब पाच पणत्या लावून आपली झोपडी प्रकाशाने भरतो. एकमेकांना भरभराटी,चांगले आरोग्य, संपन्नतेच्या शुभेच्छा देतो.वेगवेगळी पक्वान्नं देत, घेत खातो. देशाच्या आर्थिक विकासाला अशाच प्रकारे चालना देतो. कारण जगातील अनेक जाती,धर्माचे लोक जिवंत आहेत हिंदू धर्मियांच्या सणांमुळे. प्रत्येक सणाला वेगवेगळ्या वस्तुंची खरेदी- विक्री होते व मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते.
आज विजया दशमी दसरा. याची सुरूवात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करून होते. मडक्यामध्ये धान्य पेरले जाते. त्यावर अखंड नंदादीप लावला जातो. रोज फुलांची माळ, सकाळ-संध्याकाळ आरती, सार्वजनिक उत्सवातही, हे सारे सोपस्कार केले जातात. घरोघरीही घटस्थापना होते. प्रत्येक घराची पद्धत निराळी. कुणाकडे उठता-बसता सवाष्ण, कुठे अष्टमीला तर कुठे नवमीला ब्राह्मण, सवाष्ण जेवू घालतात. कुणाकडे कुमारिकेचे भोजन असते. नवमीच्या दिवशी होमहवन असते. पूर्णाहुती म्हणून पुरणावरच स्वयंपाक असतो. बरेच जण नऊ दिवस उपवास करतात. तर कुणी धान्यफराळ करतात. एकुणात नऊ दिवस धावपळीचेच असतात. काही घरांमध्ये देवीचा गोंधळही घातला जातो. त्यासाठी गोंधळी बोलावले जातात. अर्थात यावत तेलम् त्यावत् आख्यायनम् हे आलेच.
देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले. या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजिली जाते.
स्त्री शक्तीचा सन्मान करणारा हा सण.
आई, आजी, मावशी व आत्या, बहिण , पत्नी, भाची व पुतणी, मुलगी, सून व परस्त्री ही नवरात्रीची नऊ रूपे आहेत. प्रेम, समर्पण व सहनशिलतेचा त्रिवेणी संगम म्हणजे स्त्री.
आजच्या दिवशी माझ्यी जीवनात असलेल्या सर्व स्त्रीयांना सलाम व खुप खुप प्रेम.
सुरेख....लेख 👌👌
उत्तर द्याहटवाकडक सर . अतिशय सुरेख माहिती keep it up
उत्तर द्याहटवा